सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

🌷इथे संपली माणुसकी

एकदा एक माणूस जंगलात शिकारीला गेला होता. पण वाट पाहुनही त्या दिवशी सावज काही मिळाले नाही. 
          शेवटी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी तो जंगलातल्या तळ्याजवळ  थांबला.हातातला तीर कामठा खाली ठेवून तो पाणीप्यायला लागला, एवढयात समोरून वाघ येताना त्याला दिसला.
तो भीतीने पळायला लागला. वाघ पाठीमागे येतोय, हे बघून त्यांने जवळच्या झाडावर चढायला सुरुवात केली.पण झाडावर आधीच चढून बसलेलं अस्वल बघून त्याची भीतीने गाळण
उडाली.
          वर अस्वल,खाली वाघ! आता काय करायचं ?
तेवढयात अस्वल त्याला म्हणाला, "घाबरु नको. वर ये. मी तुला काही करणार नाही. मी वाघापासून जीव
वाचविण्या
साठीच इथे आलोय."

        माणूस मग वर गेला. वाघ मात्र झाडाखालीच बसून हे दोघे कधी खाली येतील यांची वाट पाहत होता.रात्र झाली तशी माणसाला झोप लागली. हे बघून वाघ अस्वलाला म्हणाला, "हा परका माणूस. त्याला खाली ढकलून दे. माझी भूक भागली की मी तुला काही करणार नाही."
           वाघाने खूप खूप पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण विश्वासू व ईमानदार अस्वलानं तसं केलं नाही.
थोड्या वेळानं माणसाला जाग आली. ठरल्याप्रमाणेच आता माणूस जागरण करू लागला व अस्वलानं जरा डोळे मिटले. वाघानं हीच  संधी साधली.तो माणसाला म्हणाला, "अस्वलाला खाली ढकल. माझी भूक भागेल आणि तुझा जीव वाचेल.
"माणसानं क्षणाचाही मागचा पुढचा विचार न करता अस्वलाला धक्का दिला. सुदैवाने माणसाचा स्पर्श होताच अस्वलाला जाग आली होती व चतुराईने अस्वलानं पंजानं फांदीला घट्ट पकडले. त्यामुळे ते पडलं नाही.पण त्याला माणसाचा विश्वासघातकी स्वभाव कळला.ते म्हणालं,"मी तुझ्याशी दगा केला नाही. परंतु तू मात्र मला फसवलंस."पशूंवर" विश्वास ठेवता येतो, "माणसांवर" नाही, हे मला आज समजलं."

🌸तात्पर्य ध्यानात ठेवा🌸

        पाठीत खंजर खुपसून कोणाचेही भले झाले नाही म्हणून अस्वलाचे हे शब्द खरे ठरवायचे की खोटे,हेआपल्या हातात आहे.

ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.मानसातली माणुसकी एवढी खाली का आली ? एवढा खालच्या पातळीवर तो का आला ? पशू पेक्षाही खालच्या थराला का गेला ? याचे आत्मचिंतन होण्याची गरजआहे.अस्वलाने दिलेला शाप म्हणूनच की, काय आज माणसं चोरी करायला लागले अन्  कुत्री त्याला शोधू लागली.लक्षात घ्या की, सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणारया असतात, याउलट जो दुसरयाला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही.

बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८

☕ _*सकाळी रिकाम्यापोटी हा खास चहा प्या आणि अॅसिडीटी पळवा !*_

🍋🍯 *लिंबू आणि मधाचा चहा*
तुम्ही अनेक लोकांना सकाळी लिंबूसोबत गरम पाणी किंवा मधासोबत गरम पाणी पिताना पाहिलं असेल. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र लिंबू आणि मधाचा खास चहा सुद्धा तुम्हाला अॅसि़डीटी होण्यापासून रोखू शकतो. तसेच याने तुम्हाला दिवसभर एनर्जीही मिळेल. हा चहा रिकाम्या पोटी प्यायल्यास फायदा अधिक होतो.

🤔 *काय होतात फायदे ?*
वजन कमी करण्यास मदत, त्वचा मुलायम आणि ग्लोइंग होते, केसगळती थांबते, किडनी आणि रोगप्रतिकारकशक्ती सुधारते

👉 *चहासाठी साहित्य*
एक लिंबू, 2 चमचे मध, 2 काळे मिरे आणि एक वेलची, 2 कप पाणी

👉 *कसा बनवाल ?*
▪ सर्वातआधी पाणी गरम करा
▪ यात वेलची आणि काळे मिरे बारीक करुन टाका. एक मिनिटापर्यंत हे गरम होऊ द्या.
▪ आता त्यात एका लिंबाचा रस आणि दोन चमचे मध टाका.
▪ दोन मिनिटे हे चांगले शिजू द्या. तुमचा खास चहा तयार आहे.

# _*न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी जॉईन करा लेट्सअप डिजिटल मॅगेझीन, त्यासाठी क्लिक करा*_ 👉 https://goo.gl/WfhA7J

*👇🏻👇🏻👇🏻Must read👇🏻👇🏻👇🏻*

एकदा शिक्षकांचे असेच एक प्रशिक्षण होते. त्यात एक निवृत्त शिक्षक पण आले होते.
सर्वजन दिवसभर
व्याकरण कोणत्या पद्धतीने शिकवायचे?
स्पेलिंग पाठ करावेत की नाही?
कविता कशी शिकवायची?
अध्यापन करताना शैक्षणिक साहित्य कोणते वापरायचे?
याचा काथ्याकूट करीत होतो.

संध्याकाळी ५ वाजले. सर्वांना जाण्याची घाई होती.

सर्वजन उठू लागताच ते निवृत्त शिक्षक बोलायला उठले आणि म्हणाले, "मी फक्त ३ मिनीटे बोलणार आहे."

वैतागानेसारे खाली बसलो. ते शिक्षक म्हणाले,
"दिवसभर तुमची सर्व चर्चा मी ऐकली.

मी एक छोटे उदाहरण सांगतो. ते जर तुम्ही नीट समजून घेतले तर तुम्ही चांगले शिक्षक व्हाल."
'आता आणखी काय उपदेश ऐकायचा' अशा भावनेने सर्व ऐकू लागले...

ते म्हणाले की,
"एका डोंगराच्या पोटाला एक झोपडी आहे तिथे एक , नवरा बायको राहतात. त्यांना एक ६ महिन्याचं मूल आहे. आजूबाजूला एक ही घर नाही. एकदा संध्याकाळी नवर्‍याला अचानक गावाला जावे लागले.

पत्नी आणि मूल एकटेच आहेत. रात्री दोघे झोपले आणि अचानक मध्यरात्री ते मूल किंचाळून रडायला लागले

ती आई काय करेल?
सांगा ना काय करेल?"

ते आम्हाला विचारू लागले.
आम्ही सारे शांत झालो.                
कुणीच काही बोलेना.
ते शिक्षक पुन्हा आम्हाला विचारू लागले, 

"ती आई बालमानसशास्त्राची पुस्तके उघडून पाहील का?
की मुलांना कसे हाताळावे याच्या वेबसाईट उघडून पाहील?"

"सांगा ना... काय करेल यातलं?"
आम्हाला मुद्दा कळला होता.

ते किंचित हसलेआणि पुढे म्हणाले,

"ती यातले काहीच करणार नाही
. ती तिला जे सुचेल ते करील. ती त्याला कडेवर घेईल. छातीशी कवटाळेल...  त्याच्यापुढे ताटली आणि चमचा वाजवेल, त्याच्यापुढे नाचून दाखवील, गाणी म्हणेल, त्याला दूध पाजील, त्याला झोपडीबाहेर आणून चंद्र दाखविल. हे सारं सारं ती........
....

तिथपर्यंत करील की जोपर्यंत ते मूल शांत होत नाही."

ते पुढे म्हणाले की,
"हे सारे ती का करील?"

"हे तिला सारे का सुचेल?"
"कारण ते तिचे मूल आहे म्हणून...!"

त्या शिक्षकांनी क्षणभर सगळीकडे बघितले बोलताना क्षणभर थांबले आणि म्हणाले,
"त्या बाईसारखे तुमच्यासमोर बसलेले मूल तुम्हाला तुमचे वाटते आहे का?तितके प्रेम तुम्हाला जर त्याच्याबद्दल वाटणार असेल तर


माझ्या मित्रांनो, तुम्ही जे काही वर्गात कराल, तेच उपक्रम असतील, तीच अध्यापनाची पद्धती असेल. तुम्ही हातात जे काही घ्याल तेच शैक्षणिक साहित्य असेल आणि तुम्ही जो विचार कराल तेच शैक्षणिक तत्वज्ञान असेल."

"यापलीकडे शिक्षण नावाचे काहीही नसते...!"


आणि ते शिक्षक शांतपणे खाली  बसले.



आम्ही थक्क झालो...
सुन्न झालो...!

सूचना :-  हीपोस्टआपल्या परिचयातील सर्व शिक्षकांना पाठवा, ही विनंती?

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD