बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

कुमठे बिट शैक्षणिक अनुभव क्र. १३


✳  खड्यातुन संख्या शिकणे.

             या उपक्रमामध्ये केवळ ९ खड्यांतून मुले एक अंकी संख्या , १८ खड्यांतून दोन अंकी संख्या , २७ खड्यांतून तीन अंकी संख्या तसेच ३६ खड्यांतून चार अंकी संख्या लिहितात व वाचतात. याप्रमाणेच कृती केल्यास मुले कोटी पर्यतच्या संख्या वाचन व लेखन करतात.

✳ कार्यपद्धती :

एकक साठी खड़े रंग - काळा
दशक साठी खड़े रंग - पांढरा
शतक साठी खड़े रंग - पिवळा
हजार साठी खड़े रंग - हिरवा
          यापद्धतीने खड्याना रंग देऊन घेणे. वर्गात साधारण १५ ते २०सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ रेखाटून घेणे. आता एका मुलाला ठराविक अंतरावरून केवळ काळे ९ व पांढरे ९ खड़े वर्तुळात टाकण्यास सांगावे. वर्तुळात पडलेले खड़े केवळ विचारात घ्यावेत व वर्तुळाबाहेरील खड़े बाजूला ठेऊन द्यावेत. वर्तुळात पडलेल्या खड्यांपैकी प्रथम पांढरे खड़े मोजावेत व नंतर काळे खड़े मोजावेत.
       उदाहरणार्थ :
     गोलात १८ खड्यांपैकी ६ काळे खड़े व ७ पांढरे खड़े पडले. यात प्रथम पांढरे खड़े मोजावेत , डायरेक्ट ७ असे न मोजता १०,२०,३०,......,७० असे मोजावेत. व नंतर काळे खड़े मोजताना मोजलेले पांढरे खड़े सत्तर आणि काळा खड़ा एक ७१ व पुढे ७२,७३,७४,७५,७६ असे मोजावेत.
          यापद्धतीने ९९ पर्यन्तच्या संख्या पहिलीचे मुले १५ दिवसात तयार करु शकतात. याप्रमाणेच २७ खड़े घेऊन ९९९ पर्यंतच्या संख्या तर ३६ खड़े घेऊन ९९९९ पर्यंतच्या संख्या पहिलीचे मुले देखील तयार करतात. पुढे वेगळ्या रंगाचे खड़े वापरून हजारच्या पुढील संख्याही तयार करता येतात.

✳ या उपक्रमातुन पुढील उद्दीष्टे साध्य होतात :

१) मुर्त वस्तु संबोधाकडुन मुले संख्या संबोधा कडे जातात.
२) गोलात खडे टाकताना मुले आनंदायी पध्दतीने संख्या शिकतात .
३) घोकम पट्टी शिवाय संख्याचे दृढीकरण होते .
४) लहान वयोगटासही संख्या पटकन समजण्यास मदत होते.
५) एकक ,दशक, शतक ,हजार हे स्थानिक संबोध समजतात.

         या उपक्रमाचा सराव घेतल्यानंतर इ .३री च्या वर्गात मला आलेला अनुभव असा की, जी मुले संख्यावाचनात चुका करत होती , पाठीमागे होती ती मुले अतिशय आनंदाने व दडपणाशिवाय संख्या वाचन व लेखन करू लागली .
अगदी  पहिलीच्या वर्गास याच पध्दतीने सराव दिल्यानंतर ती मुले देखील ३ अंकी संख्या लवकरात लवकर वाचायला लागली. कुमठे बीटातील राकुसलेवाडी शाळेतील शिक्षक श्री .सुतार सर यांच्या कल्पनेतून कृतीत आलेला हा गणिती संख्या खेळ सर्वांना नक्कीच आवडेल.
          धन्यवाद!!!

                   गौरी पाटील
          उपशिक्षिका - चांदोरी मुले,
          ता.- निफाड, जि. नाशिक.

♦ गणितातील गंमत-जमत♦

नमस्कार मित्रानो,
दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हा घटक इयत्ता चौथी पाठयक्रमात आहे. तोच घटक आनंददायी पद्धतीने घेता येतो. या घटकाच्या सरावाबरोबर वजाबाकीचा देखील सराव यातून घेता येतो.हे सर्व थोर भारतीय गणित तज्ञ श्री.काप्रेकर यांचा स्थिरांक 6174 मुळे... काप्रेकरांनी हे इ.स.1949 मध्ये शोधून काढलं.यालाच 'काप्रेकारांचा स्थिरांक 1949' म्हणून ओळखलं जातो.

यांच्याविषयी वाचलं आणि याचा आज चौथी वर्गात वापर केला.खूप छान प्रतिसाद मिळाला.
चला तर मग जाणून घेऊया..
'काप्रेकर स्थिरांक-6174 '
====================
��प्रथम अशी चार अंकी संख्या निवडा, की त्यातील अंक सारखे नसतील म्हणजे (1111 किंवा 2222 नसतील अशी.

��त्या संख्येतील अंकांपासून मोठयात मोठी व लहानात लहान संख्या बनवून त्याची वजाबाकी करा.

��त्याचे जे उत्तर येईल त्यापासून परत ही कृती करा.आणि असे परत परत करत राहा.

��काही स्टेप ओलांडल्यानंतर दरवेळी उत्तर 6174 च येते.

प्रत्यक्ष उदाहरण पाहूत.
��आपण 2013 ही संख्या घेऊ.
त्यापासून मोठयात मोठी- 3210
लहानात लहान - 0123
याची वजाबाकी
3210 - 0123= 3087

��आलेल्या उत्तरापासून परत वरील प्रमाणेच कृती करुत.
8703 - 0378 = 8352
8532 -2358 = 6174
7641 - 1467 = 6174
��अशाप्रकारे परत परत तीच संख्या येते. 6174 हा काप्रेकरांच्या क्रियेचा गाभा आहे आणि हेच त्याचे वैशिष्ट्य देखील...

��������������������
याचे फायदे पाहूत.
१) लहान मोठी संख्या सरावासाठी मनोरंजक पद्धती.

२)मुलं आवडीने संख्या बनवतात व उदाहरणे सोडवतात.

३)जलद गणिती उदाहरण सोडविण्याची स्पर्धा निर्माण होते.

Try it amazing..

धन्यवाद..!������

���� संकलन ����
    उमेश कोटलवार

भारतीय 'गप्प बसा' संस्कृती


सर्वात चिकित्सक आणि विवेकाच्या अगदी जवळ कोण असते...? तर मला वाटतं की लहान मूलं ही सर्वाधिक चिकित्सक असतात आणि विवेकाच्या जवळ असतात...!
मूल ज्यावेळी बसायला लागतं...हळूहळू चालायला लागतं...बोलायला लागतं...त्यावेळी त्याची चंचलता अधिकच वाढलेली असते...या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी नवीन असते...त्याला समजून घेण्यासाठी ते धडपडत असतं...
लहान मुलाचा मेंदू हा कोऱ्या संगणकासारखा असतो...
जे-जे काही मिळेल त्यावर प्रक्रिया करणे..आणि साठवून घेणं...हा त्याचा ध्यास असतो..!
'धर्म' आणि 'जात' ही जन्माने मिळणारी गोष्ट आहे... त्यात कोणताही पराक्रम नाही...!
पण लहानपणापासूनच या धर्मसंस्काराच्या गोंडस नावाखाली अनेक गोष्टी आपण त्याच्या माथी भरत असतो...किंबहुना अनेक गोष्टींपासून त्याला अटकाव घालत असतो...!
आपण काय करतो..?
तर त्याला मूर्तिपुढे उभं करतो...आणि त्याला हात जोडायला लावतो...मूल हात जोडत नसतं,तरी आपण बळजबरी हात जोडायला शिकवतो...त्याला जमिनीला डोकं टेकवून नमस्कार करायला शिकवतो...
आणि त्याला म्हणतो...
'म्हण...मला चांगली बुद्धी दे..!मला शक्ती दे..!'
खरं तर देव या अलौकिक संकल्पनेपासून लहान मूल हे पूर्णपणे अनभिज्ञच असते...!

आणि सवयीने आपण नकळत त्याच्यावर असं बिंबवत असतो की...हि जी समोर ठेवलेली दगडाची मूर्ती आहे...ती तुला चांगली बुद्धी देईल...तुला शक्ती देईल...तुझं रक्षण करेल..!
आणि हे सगळं तूला तुझ्या केवळ बुद्धिसामर्थ्यावर...कर्तृत्वावर नाही तर ह्या देव नावाच्या काहीतरी अलौकिक गोष्टीपुढे नतमस्तक झाल्यावरच जमेल...
तोच कर्ता-धरता आहे...विघ्नहर्ता आहे...तोच तारेल...आणि...तोच मारेल..!
इथला सगळ्यात महत्वाचा संस्कार हा आहे...की ' प्रश्न विचारणारी मानसिकता मारून टाकायची..?' आणि 'गप्प बसा संस्कृती' रुजवायची..!
प्रश्न विचारने हा उद्धटपणा असून ते इथल्या संस्कारात मुळीच बसत नाही..!
लहानपणापासुन  जिज्ञासेच्या पोटी मुलं अनेक गोष्टी समजून घ्यायला उत्सुक असतात...
ह्याला हात लाव...त्याला हात लाव...हे वाजवून बघ...ते आपट...!
त्याला प्रत्येक गोष्ट 'हे काय आहे..?' हे जाणून घ्यायचा ध्यास असतो...
त्यासाठी प्रत्येक गोष्टीला 'असे का...?' असा प्रश्न साहजिकच ते विचारायला लागतं...
'कडी वाजल्यावर भांडने कशी काय होऊ शकतील..?,शनिवारी नखे का कापू नयेत.?,मांजर आडवं जाण्याचा आणि काम न होण्याचा संबंध काय.? वगेरे-वगेरे गोष्टी त्याला भंडावून सोडत असतात...!
पण ज्यावेळी ते घरातल्यांना प्रश्न विचारतं की,"बाबा गणपतीला चार हात कसे काय ओ..? आपल्याला का नाहीत...?"
तेंव्हा फार-फार तर बाबा 'अरे तो देव आहे...!' इतकंच उत्तर देऊ शकतील..! पण त्यांच्या या उत्तराने नक्कीच समाधान होणार नसतं...मग तो आणखी पुढे जाऊन ज्यावेळी अस विचारतो की..'बाबा त्याला सोंड कशी काय..?' मग त्याला ती नेहमीचीच कथा ऐकवली जाते...! एवढ्यानेही तो गप्प बसत नाही...यापुढेही जाऊन तो असे अनेक प्रश्न विचारू पाहतो...की ज्याची उत्तरं देणं, हे जमणं शक्यच नसतं...
'शंकराला तिन डोळे कसे...इथपासून ते रावणाला 10 तोंडे कशी..?
मग नेहमीप्रमाणे अशावेळी किंवा सर्वसामान्यतः "कार्ट्या...गप्प बैस देवासारखा...!" हे उत्तर तर ठरलेलेच असतं..!
म्हणजे जिथे 'गप्प बसणे...हे देवपणाचे लक्षण मानलं जाते..' तिथली मुले पुढे प्रश्न विचारायला कशी धजावणार...?
'प्रसाद उजव्याच हातात का घ्यायचा...डाव्या हातात का नाही...? गणपतीने तर मोदक डाव्या हातातच घेतलाय..!'
अशी चिकित्सा लहान मुलाला उद्धट ठरवून मोकळी होते..!
असे तर्क करुण प्रश्न विचारलेले चालत नाहीत...कारण हां त्यांना त्यांच्या श्रद्धेवरील आणि धर्मामवरील हल्ला वाटतो...!

लक्षात घ्या...
मानवी इतिहासामधे वाघ निर्माण होऊन झाली 4 कोटी वर्षे....आणि माणूस निर्माण होऊन झाली अवघी 5 लाख वर्षे...! गुहेत राहनारे,शिकार करणारे,मांस खाणारे,नग्न फिरणारे हे दोन्ही प्राणी आज तसेच आहेत का...?
माणूस प्राण्याने वाघ प्राण्यापेक्षा प्रगती केली...म्हणून आज तो साऱ्या विश्वाचा स्वामी बनला...मात्र जंगलातील वाघ तसाच राहिला...!
याच कारण काय..?
याच कारण असं...की माणूस प्राण्याला 'प्रश्न' पडले...वाघाला कधीच असा प्रश्न पडला नाही की 'पाऊस का पडतो..? पण तो माणसाला पडला...त्याने अशा प्रश्नामागची कारणे शोधली...

'माणसाचा आजवरचा इतिहास..हे दुसरं-तिसरं काही नसून तो श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे...!'

अग्निला...पावसाला...जंगलातील वणव्याला...काहीतरी अचाट आणि अलौकिक मानणारा माणूस प्राणी जर त्याविषयी गप्प बसला असता आज तो 'विश्वाचा स्वामी' या स्थितीला नसताच..! तो इतर प्राण्यापेक्षा कमी काळात पुढारला...याचे कारण...त्याला प्रश्न पडले...आणि त्याने या प्रश्नासाठी आपल्या 'श्रद्धा'तपासल्या...!

पण जर 'प्रश्न विचारायचा नाही...जे पूर्वापार चालत आलेले आहे...ते मुकाट्यांन स्विकारायचं..!'
'हे असे का..?ते तसे का...?' असे प्रश्न अजिबात विचारयचा नाही...! अशी मानसिकता जर इथे संस्कार म्हणून बिंबवली जात असेल...तर आपण 'माणूस' म्हणून पुढे जातोय की मागे..?

यातील नीतीसाठी म्हणून बिंबवल्या जाणाऱ्या ह्या आणि अशा गोष्टी नंतर 'नितीसाठी कमी आणि भितीमुळे आणि भीतीसाठी' जास्त पोसल्या जातात...! आणि ह्याच गोष्टींचा अतिरेक पुढे जाऊन अनितीलाही कारणीभूत ठरतो...!

भुत नावाचा संस्कारही आपण पदोपदी त्याच्या माथी मारत असतो...
'जेव नाही तर बागुलबुवा येईल..!'
अशा मानसिकतेतून त्याला नेभळट बनवण्याचा संस्कार केला जातो...
या जगात सुष्ट आणि दुष्ट शक्ती आहेत...की ज्या चांगलं किंवा वाईट घडवत असतात...
सुष्ट शक्तींची उपासना...आराधना दुष्ट शक्तिपासून वाचवन्यास मदत करेल...वगेरे-वगेरे...हां संस्कार  सुद्धा ओघाओघाने लहान मुलावर होतोच...!
ह्या सगळ्याच्या दरम्यानच त्याला ओळख होते ती...
'मोक्ष,आत्मा-परमात्मा,पुनर्जन्म,नशीब, पूर्वसंचित..' या आशा 'अध्यात्म' नावाच्या गोड-गोंडस नावाखाली खपवल्या जाणाऱ्या फालतुगिरीची...!
साहजिकच या गोष्टीबद्दल आकर्षण वाटणं..आणि त्या समजून घेणं...हे आलच...!
पण ह्या सगळ्या गोतावळ्याची मांडणी 'बाबापरत्वे...पंथपरत्वे...धर्मपरत्वे....बदललेली असते..!'
ह्या बाबतीत निश्चित असं ठोस उत्तर...पुराव्यानिशी मांडणी कुणीच केलेली नाहिये...'श्रद्धा ठेवा..' हे एकच काय ते परिमाण या तकलादू गोष्टींचा मुख्य आधार आहे...!
'तर्क-कुतर्कासी....
ठाव न लगे सायासी...
येथे भावची प्रमाण...
ठेवा जाणीव गुंडोण..."
म्हणजे...तर्क करायचा नाही कारण तो कुतर्क आहे... भावनेलाच प्रमाण माना...जाणीव गुंडाळून ठेवा..."
याला श्रद्धा कशी म्हणता येईल...?
प्रश्न न विचारता अशी जाणीव गुंडाळून ठेवणं...आणि 'हो ला हो' म्हणणे हेच काय ते अध्यात्म..! ह्या सगळ्या गोष्टी ह्या मुलाच्या जडण-घडणीच्या काळात पुरेपूर घुसडल्या जातात...
"तुझी परिस्थिती आता अशी आहे..याचे कारण हे तुझ्या पूर्वजन्मीचं हे फळ आहे...हेच तुझ्या नशिबात आहे....पूर्वसंचित आहे...! आणि तुझ्या ह्या जन्मीच्या वागणुकीचं फळ तुला पुढच्या जन्मी मिळेल...!" हा कर्मविपाकाचा सिद्धांत हे इथल्या मानसिकतेचं पूर्वापार चालत आलेलं मूळ आहे...!

डॉक्टर-इंजिनिअर बनूनही भ्रामक वास्तुश्रद्धाशास्त्राने घराची बांधणी करणारी... जोतिषाकडे जाऊन हातातल्या रेषांमधे भविष्य शोधणारी...आणि कुंडलीेतल्या मंगळाच्या अस्तित्वावर लग्न करावे की नको...याचा निर्णय घेणारी तरुण पीढी 'प्रगल्भ आणि विज्ञानवादी' कशी म्हणता येईल...?
21 व्या शतकातही विज्ञानाचा वापर करुन दैववादी मानसिकतेचचं मार्केटिंग होणार असेल ...किंबहुना ते जास्त जोरात होणार असेल तर ते 'होमिसेपिअन-सेपियन' (अधिक प्रगल्भ होत जाणारा) म्हणवून घेणाऱ्या माणसाला हे कसे शोभेल...?
हे सगळे चालुये...
याचं कारण माणसानं "विज्ञानाची सृष्टी आत्मसात केलीये पण विज्ञानवादी दृष्टी आत्मसात नाही केली...!"
आजवर अशी एकही गोष्ट नाही की जीची उत्तरे शोधण्यास या दैववादी मानसिकतेने मदत केलीये...!आयुष्यात आलेल्या संकटांची उकल दैववादी मानसिकतेतून होणं अशक्य आहे...!

लहानपणापासून अशा पद्धतीने तयार होणारी दैववादी मानसिकता ही इथल्या 'प्रश्न विचारायचाच नाही' या संस्काराचा आणि 'गप्प बसा' संस्कृतीचा परिपाक आहे..!

आणि म्हणूनच भगतसिंग म्हणाला होता की, "या देशातले जे तरुण दैववादी आहेत ते माझ्या दृष्टीने नामर्द...नेभळट आहेत..!"
'का..?' हा प्रश्न विचारायला सुरवात करणे ही या दैववादी मानसिकतेला तिलांजली देण्याची सुरवात आहे..!
साहजिकच काही प्रश्नांना वयाचं बंधन आहे...!

पण प्रश्न आहे तो 'प्रश्न विचारायचाच नाही...'
या संस्काराचा...!
हा संस्कार 'माणूस' म्हणून पुढे नेणारा की मागे नेणारा...?

याचा कुठेतरी विचार व्हायला हवा..!

येणारी भावी पिढी त्याचवेळी विज्ञानवादी आणि प्रगतशील म्हणता येईल ज्यावेळी ती 'का..?' हां प्रश्न आपल्या जिभेवर नेहमी ठेवेल आणि आपल्या प्रश्नांची उकल 'मन...मनगट...आणि मेंदू' यावर विश्वास ठेवूनच करेल...अस मला वाटतं...!    .

शालेय पोषण आहार गणक २.३

===================
Android App वैशिष्टे:
��आताऑनलाईन असताना जाहिराती नाहीत..
��Data सेव केलेला करप्ट होणार नाही.
��मोबाईलचे Back Button चा उपयोग.
��BMI Caluculator चा समावेश. (नवीन)
��पूरक आहार नियोजन व बदलण्याची सुविधा
��पाककृती नियोजन व बदलण्याची सुविधा
स्वतःच्या प्रमाणात सेव करा.
��होम पेजवर शाळेचे नाव टाका.
��पहिल्या पेक्षा वेगात कार्य करते.

डाऊनलोड साठी खालील लिंक वर क्लिक करा.

http://www.curiosityworld.in/p/downloads.html

संगणक व गुन्हा

**

       संगणक सर्व्हरमध्ये संगणक मालकाची परवानगी न घेता प्रवेश करणे, त्याच्या ई-मेल अकॉऊँटमध्ये प्रवेश करणे किंवा लॉग-इन -आयडीमध्ये प्रवेश करणे  व हॅक करणे हा हॅंकिंगचा गुन्हा होतो.त्यासाठी माहीती व तंत्रज्ञान (दुरुस्ती) कायदा २००८च्या कलम ६६अनुसार गुन्हा होतो.त्यासाठी ३वर्षपर्यंत तुरुंगवासाची किंवा ५लाख रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे .
       संगणकामध्ये आपला वैयक्तीकडेटा,कार्यालयाचा डेटा किंवा अत्यंत महत्वाची माहीती असते त्यावर कार्यालयाचा व्यवसाय निर्भर असतो.हार्ड डिस्कवरुन, पेन ड्रॉईव्ह, डीव्हीडी, सीडी,मोबाईल किंवा ई-मेल फॉरवर्ड करून तो डेटा स्वतः उपयोगात आणणे किंवा दुसऱ्याला मालकाला परवानगीशिवाय पाठविने हा डेटा चोरीचा गुन्हा होतो व तो सुध्दा माहिती तंत्रज्ञान दुरुस्ती कायदा २००८च्या कलम ६६अन्वये गुन्हा असून त्यालाही वरीलप्रमाणे शिक्षेची तरतूद आहे .
      व्हायरस पसरवून एखाद्या संगणकांतील डेटा खराब करणे व ते बुध्दीपुस्सररीतीने केले असेल तर तो माहिती तंत्रज्ञान (दुरुस्ती) कायदा २००६च्या कलम ४३(सी) व ४३(ई) नुसार चूक आहे  व माहिती तंत्रज्ञान कायदा (दुरुस्ती)कलम ६६ नुसार फौजदारी गुन्हा आहे. भा.दं.वि.४६८ नुसार सुध्दा गुन्हा आहे.
       ईमेल,चॅट, मेसेजींग, एसएमएस,मोबाईल,फेसबुक,सोशल नेट्वर्किंग किंवा वेबसाईटचा वापर करून एखाद्याला घाबरवणे,छळने किंवा मानसिकत्रास देणे हा सायबर बुर्लीग  गुन्हा आहे. यासाठी माहिती तंत्रज्ञान (दुरुस्ती) कायदा २००८ च्या कलम ६६(अ)अन्वये गुन्हा होतो.वरीलप्रमाणे शिक्षा होऊ शकेल. भारतीय दंड विधानाचे कलम ५००,५०६,व ५०७अन्वये सुध्दा गुन्हा होतो. म्हणून फेसबुकवर किंवा अकॉऊँट वर स्वतः बद्दल खोटी माहीती देऊ नये. कुणाबद्द्ल विचित्र असे कमेंट्स लिहू नये . अभद्र अश्लील किंवा कुणाच्या भावना दुखावतील असे अभद्र लिहू नये .
       स्वतः ची ओळख न देता दुसऱ्याचव्यक्तीचे नाव धारण करून स्वतः ची खोटी ओळख देऊन फायदा उपटने व दुसऱ्याला नुकसान पोहचविणे हा गुन्हा माहीती तंत्रज्ञान (दुरुस्ती)कायदा २००८च्या कलम ६६(डी)अन्वये गुन्हा असून ३वर्षे तुरुंगव १ लाखरुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.भा .दं.वि ४१९अन्वये सुध्दा तोतयागीरीचा गुन्हा होतो.
     देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात यावी म्हणून जर कुणी अफवा पसरविणाऱ्य बाबी सायबर स्पेसमद्ये टाकेल,ई-मेल पाठवेल तर तो माहीती तंत्रज्ञान (दुरुस्ती) कायदा २००८ च्या कलम ६६ (फ)अन्वये गुन्हा आहे.तसेच भा. दं. वि .च्या कलम १५३-ब अन्वये सुध्दा गुन्हा होईल .
      बोगस ई-मेल पाठवून कुणाला खोटी माहीती देणे व फसवणुक करणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (सी) व ६६(डी) नुसार गुन्हा आहे.तसेच भा.दं.वि कलम ४२० व  ४१५ अन्वये सुध्दा गुन्हा आहे .
       एखाद्या व्यक्तीचा ई-मेल आयडी हॅक करून बदनामी करणारा मेल केला जाणे व त्यामुळे ज्यांचा ई -मेल आहे तो नाहक बदनाम होतो.याला ई-मेल स्पुफिंग म्हणतात.अशा कृत्यासाठी माहीती तंत्रज्ञान (दुरुस्ती) कायदा ६६ (डी) नुसार गुन्हा होतो त्यासाठी ३ वर्ष तुरुंग व १ लाखारुपयांपर्यंत दंडच्या शिक्षेची तरतूद आहे.भा.दं.वि ४१७, ४१९,४६५अन्वये सुध्दा गुन्हा होईल .
       दुसऱ्याच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिटकार्डव्दारे  त्यांच्या संमतीशिवाय पैसे काढणे किंवा त्या कार्डच्या आधारे वस्तू खरेदी करणे किंवा बँकेला चुकीची माहीती देऊन क्रेडिट कार्ड किंवा डेबिटकार्ड मिळविणे हा माहिती तंत्रज्ञान (दुरुस्ती) कायदा २००८च्या कलम ४३(अ), ४३(ब) व ४३(सी) चा भंग असून या कायद्याला कलम ६६ अन्वये फौजदारी गुन्हा आहे. त्यासाठी ३ वर्षे तुरुंग व  ५ लाखांपर्यंत दंडच्या शिक्षेची तरतूद आहे.शिवाय भा.दं.वि. ४२०, ४६७,४६८,४७१ अन्वये सुध्दा गुन्हा होईल.
       एकाद्या लेखकांचा लेख पुस्तक, कविता, माहिती इत्यादीची चोरी करून स्वतः चे आहे असे भासवीने कॉपीराईट ॲक्ट ५१,६३,६३(अ)गुन्हा आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ च्या ६३अन्वये सुध्दा गुन्हा आहे .
       अश्लील चित्रे वैशयीक भावना चालवणारे मजकूर इंटरनेटवर प्रकाशित करणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(अ)अन्वये व भा.दं. वि. च्या कलम २९२,२९३,२९४,५००,५०६, व ५०९ इत्यादी अन्वये प्रकरण परत्वे गुन्हा होईल.इंटरनेटव्दारे जुगार खेळने हा जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा आहे.
     वेबसाईट विद्रुप करणे,वेबसाईटवर बळजोरीने ताबा मिळविणे, बेकायदेशीरपणे वस्तु विक्रीस ठेवणे, वेबसाईटवर बदनामीकारक मजकूर लिहिणे, नक्कल करणे म्हणजे पायरसी  करणे. डिजिटल सहीबाबत बनावटीकरण करणे, फिशिंग करणे,संगणक नेटवर्क सर्व्हर इ.कामात व्यत्यय आणणे असे कृत्य गैरकायदेशीर असून त्यासाठी माहिती तंत्रज्ञान (दुरुस्ती) कायदा २००८अन्वये गुन्हा होतो .
����������������
         ***********
रविंद्र अडसुरे, वकील सर्वोच्च न्यायालय

कन्यादान (नक्की वाचा डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही)


खरंच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लेकीला परक्याच्या हातात देताना बाबा किती तुटत असेल ना ????

किती आर्त वेदना होत असतील त्याला !!!

बाप  आणि लेक हे नाते शब्दांत मांडणे कठीण.

आणि ह्याचा अनुभव मी प्रत्येक क्षणी घेते.

बाबा हा शहाळ्यासारखा असतो , बाहेरून कितीही कठोर असला तरी आतून मात्र नितळ आणि मधुर पाण्याचा झरा असतो.

कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर …

लेक जर घराचे सौख्य असेल तर त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो.

संस्कार देणारी आई असली तरी ते संस्कार जपणारा बाबा असतो.

संयम देणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबा असतो.

बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो , लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही  बाबा असतो.

कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही  बाबाच असतो.

पिकनिकसाठी पण पैसे बाबच देतो.

shopping करताना आईने कमी  किमतीचा dress काढला तर हळूच लेकीला विचारून भारी किमतीचा dress घेणारासुद्धा बाबाच असतो.

आईने काही काम सांगितले तर तिला दटावणारासुद्धा बाबाच असतो.

लेकीचे पहिले बोबडे बोल , तिने टाकलेले पहिले पाऊल , तिचे लाडिक वागणे,  तिची घरभर पैंजणांची छुमछुम हे सगळे पाहून सुखावतो तो बाबा असतो आणि

लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळणारा आणि प्रसंगी रागे भरणारा पण बाबाच असतो.

पण त्यात त्याची लेकीसाठी तळमळ असते, तिच्यासाठीची काळजी असते.

लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणाराहि बाबाच !!!

आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचे धन हे कटू सत्य पचवणाराही बाबाच !!!

ज्या लेकीला २०-२५ वर्षे जीवाच्या पलीकडे सांभाळले तिला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचे हृदय काय तुटत असेल ह्याची कल्पनाही करता येणार नाही.  आर्त धागे तुटल्याची ती वेदना कोणीच नाही समजू शकणार.

आपल्या लेकीला माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी जाताना पाहताना ढसाढसा रडणाराही बाबाच असतो.

आपल्या लेकीचा हात परक्याच्या हाती देताना आतून तुटणारा बाबाच असतो.

"दिल्या घरी सुखी रहा  म्हणताना " मनातून खचलेलाही बाबाच असतो.

असा हा बाबा त्याच्या लेकीचे सर्वस्व असतो.

आणि फक्त लेकच तिच्या बाबाचे मन ओळखू शकते.

लेकीचा स्वतःपेक्षा  जास्त विश्वास तिच्या बाबावर असतो.

लग्नानंतर मुलीचे नाव जरी बदलले तरी तिचे बाबा बरोबरचे नाते कधीच बदलत नाही .

ती शेवटपर्यंत तिच्या बाबाची छोटी परीच असते.

एक गोंडस परी …

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD