Pages

संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

lmcschools लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
lmcschools लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १० जानेवारी, २०१९

*शिवकालीन वजने(मापे)-*.



*शिवकालीन वजने(मापे)-*.

 * अठवे- शेराचा 1/8
 * अडशेरि- अडीच शेर
 * अदपाव- अर्धा पावशेर
 * अदमण- अर्धा मण
 * अदशेर- अर्धा शेर
 * अधोली- अर्धी पायली
 * अंजली- ओजळभर पानी
 * आटके- अर्धा शेर
 * आढक- चार शेर, पायली
 * कर्ष- सोळा माषांचे एक परीमाण
 * कार्त- पाव रत्तल
 * किळवे- अर्धा छटाक, अर्धे निवळे
 * कुडव- आठ शेर
 * कुंभ- वीस खंडी
 * कोथळी- मुंबईत 6 मणांची गोनी
 * कोड- खंडी, वीस मण
 * कोळवे- शेराचा अष्ठमांश
 * खारी- 16 द्रोण, एक खंडी
 * गरांव- अर्ध गूंज माप
 * गिधवे- धान्य मोजन्याचे एक माप
 * गुंज-  एक वजन परिमाण
 * चंपा- दोन शेर धान्याचे माप
 * चवाटके- छटाक
 * चवाळामण- एक प्रकारचा मण
 * चाटंक- पांच तोळे वजनाचे परिमाण
 * चाळीसा- चाळीस शेरांचे माप
 * चिटके- अर्ध्या कोळव्याचे माप
 * चिपटे- पावशेराचे माप
 * चिमटी- हाताचा अंगठा व तर्जनी याच्या पकडित मावनारा पदार्थ
 * चिळवे- कोळव्याचा निम्मा भाग
 * चोथवा- एक पायली
 * चौटके- चार टाकांचे माप,छाटाक, चवटके
 * चौशेरी- चार शेरांचे माप
 * छटाकी- छटाक
 * छतिसी- छत्तीस परिमानाचे वजन
 * टवणा- पांच शेरांचे माप
 * टांक- एक तोळा
 * टिपरी- मापी पावशेर
 * टोमणे- पांच शेरांचे तेल मोजन्याचे माप
 * टवका- दोन्ही हातात मावेल एवढे परिमाण, कवटा
 * डवक- वस्तुवर पाचही बोटे पसरुन मारून घेतलेले परिमाण
 * डोळा- 16 शेरांचे माप
 * धडा- दहा शेरी वजन केलेल्या मापाचे परिमाण
 * धरण- सुमारे 24 गूंजाइतके वजन
 * नकटे- अर्ध्या पावशेराचे माप,निपटे,नवटाक,10 तोळ्यांचे वजन
 * नग- कापसाचे वजन करण्याचे एक परिमाण
 * नाकटी- दीड पावशेराचे माप
 * नाळके- एक माप
 * निउटके- शेराचा बत्तीसावा हिस्सा
 * तोळा- 96 भार गुंजांचा तोळा
 * पक्का शेर- 80 तोळ्यांचा शेर
 * पड- मापी 2 शेर, पाउन शेर
 * पल- 40 मासे वजन, 380 गुंजांचे वजन
 * पल्ला- 30 पायली किंवा 120 शेर, 120 शेरांचे अडीच मणाचे पक्के वजन
 * पान- पावशेर
 * पाभ- एक प्रकारचे माप
 * पायली- चार शेरांचे माप
 * पायली- 48 शेरांची खानदेशि एक पायली
 * पिक्कल- 5320 सुरती रूपये भार वजन
 * पिटके- अदपाव
 * फरा/फरी- धान्य मोजन्याचे साधन
 * बेताळामण- 1568 सुरती रुपयांचे एक माप
 * भरा- धान्याचे एक माप
 * भरो- चार खंडीचे कुडाळ प्रांतातिल एक माप
 * भार- आठ हजार तोळे वजन
 * मणखाण- सुमारे एक मण
 * मणका- एक मणाचे माप
 * मापटे- अर्धा शेर
 * मापारी- धान्य ई. मोजन्याचे फरां नावाचे एक माप
 * माष- पांच, आठ किंवा दहा रत्तीच वजन
* मासा- आठ गुंजांचे वजन
 * मुटला- सहा शेराची गुळाची ठेप
 * मूठ- मुठभर धान्य
 * रत्तल/रतल- सुमारे 15 औसांचे म्हणजे 36 सुरती रूपयांइतके वजन
 * रोवळा- एक माप
 * लिक्षा- मोहरीच्या दाण्याच्या एक षोडशांश वजनाइतके परिमाण
 * वाल- तिन गूंजाभर वजन
 * वैताद- एक तृतयांश तोळा
 * शणपो- भात मोजन्याची मोठी ओंजळ
 * शिरिद- पावशेर
 * शीग- धान्याचे माप भरले असता मापाच्या वर येणारी निमुळती रास
 * शिगवर- अगदी शीग लोटून सपाट केलेले माप
 * शेर- पदार्थ तोलावयाचे किंवा मापावयाचे एक प्रमाण
 * साक- एक हाताची ओंजळ
 * सामाशी- सहा मासे वजनाचे
 * सोट- सुमारे 20 पायली धान्य भरून तोंड शिवलेले पोते


कालमापन/दिनदर्शिका

कालमापन/दिनदर्शिका

कालमापन किंवा दिनदर्शिकेवर प्रश्न विचारलेच जातात. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडविताना अवघड वाटतात. मात्र खालील नियमांचा योग्य अभ्यास केल्यास आपण कमी वेळात अचूक प्रश्न सोडवू शकतो.

सामान्य वर्ष :-

1)    एकूण दिवस 365 म्हणजे एकूण आठवडे 52 + 1 अधिक दिवस.

2)    सामान्य वर्षांत एक दिवस जादा असल्याने पुढील वर्षी त्याच तारखेला वार 1 दिवसांनी पुढे जातो.

    1 जानेवारी 1997 ला मंगळवार असेल तर 1 जानेवारी 1998 ला बुधवार असेल.

3)    सामान्य वर्षांत फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस येतात. सामान्य वर्षांत फेब्रुवारीच्या तारखेस येणारा वारच पुढील महिन्यातील त्याच तारखेस येतो.

उदा. 4 फेब्रुवारी 2007 ला मंगळवार असेल तर 4 मार्च 2007 ला मंगळवारच असेल.

4)    सामान्य वर्षांत 1 जानेवारीला असणारा वार 53 वेळा येतो आणि बाकीचे वार प्रत्येकी 52 वेळा येतात.

5)    30 दिवसांच्या महिन्यानंतर पुढील महिन्यात त्याच तारखेला येणारा वार दोन दिवसांनी तर 31 दिवसांच्या महिन्यांनंतर पुढील महिन्यात त्याच तारखेचा वार तीन दिवसांनी पुढे जातो.

6)    1 जानेवारीला जो वार येतो तोच वार 31 डिसेंबरला असतो.
लीप वर्ष :-

1)    ज्या वर्षांला 4 ने नि:शेष भाग जातो आणि ज्या वर्षांच्या शेवटी दोन शून्य असल्यास 400 ने नि:शेष भाग जातो ते लीप वर्ष होय.

उदा. 1980,1996, 2000,1600 इ. परंतु 1800 लीप वर्ष नाही.

2)    लीप वर्षांत एकूण 366 दिवस असतात. तसेच 52 आठवडे + 2 अधिक दिवस.

3)    लीप वर्षांत 2 दिवस जादा असल्याने पुढील वर्षी त्याच तारखेला वार 2 दिवसाने पुढे जातो. उदा. 1 जानेवारी 2004 गुरुवार तर 1 जानेवारी 2005 गुरुवार + 2 = शनिवार

4)    लीप वर्षांत 1, 2 जानेवारीचे वार वर्षांत 53 वेळा तर इतर वार 52 वेळा येतात.

5)    1 जानेवारीला जो वार असतो, त्याचा पुढील वार 31 डिसेंबरला असतो.

6)    7 दिवसांचा एक आठवडा असतो, म्हणून प्रत्येक आठवडय़ाने तोच वार पुन्हा येतो.

उदा. 1 तारखेला जो वार तोच वार 8, 15, 22, 29 तारखेला येतो.

संपूर्ण वर्षांतील जादा दिवस :

जानेवारी = 31 दिवस म्हणजेच 4 आठवडे + 3 दिवस ( ए७३१ं) याप्रमाणे

    जाने    फेब्रु.    मार्च    एप्रिल    मे    जून   

      3       0/1      3         2         3     2

    जुल    ऑगस्ट    सप्टेंबर    ऑक्टो.    नोव्हें.    डिसेंबर

      3          3             2            3            2            3

महत्त्वाची उदाहरणे :-
प्र. 1.    एका लीप वर्षांतील स्वातंत्र्यदिन शुक्रवारी असेल तर त्याच वर्षी प्रजासत्ताकदिनी कोणता वार असेल?

पर्याय :    1) रविवार    2) गुरुवार    3) शुक्रवार    4) शनिवार

स्पष्टीकरण : 15 ऑगस्टला जर शुक्रवार असेल तर सर्वप्रथम आपण 15 जानेवारीचा वार काढू.   

जादा दिवस = जुलचे 3 + जुनचे 2 + मे 3 + एप्रिल 2 + मार्च 3 + फेब्रुवारी 1 + जाने. 3 = 17 दिवस जादा

म्हणून : 177 = बाकी 3 म्हणजे शुक्रवारच्या मागे 3 दिवस = मंगळवार म्हणजे 15 जानेवारीला मंगळवार येतो म्हणजे 22 जानेवारीला (मंगळवारच + 4) असेल म्हणून 26 जानेवारीला शनिवार असेल.

प्र. 2.    अमितचा वाढदिवस 23 मार्च 2005 रोजी बुधवारी असेल तर 9 सप्टेंबर 2005 ला कोणता वार असेल?

पर्याय :    1) मंगळवार    2) गुरुवार    3) शुक्रवार    4) सोमवार

स्पष्टीकरण :  पद्धत एक :  23 मार्च ते 9 सप्टेंबपर्यंत दिवस

= 8 + 30 + 31 + 30 + 31 + 31 + 9 = 170 दिवस

म्हणून  1707   = 24 आठवडे + 2 दिवस

जर 23 मार्चला बुधवार असेल तर 9 सप्टेंबरला बुधवार + 2 = शुक्रवार असेल.

पध्दत दुसरी : 2005 हे सामान्य वर्ष असल्याने

जादा दिवस = 8 + 2 + 3 + 2 + 3 + 3 + 9 = 30

(जादा दिवसांचा तक्ता अभ्यासावा)

म्हणून 307  = 4 आठवडे + 2

जर 23 मार्चला बुधवार असेल तर 9 सप्टेंबर ला  बुधवार + 2 = शुक्रवार असेल.   
प्र. 3. अमितचा जन्म 26 एप्रिल 2001 रोजी बुधवारी झाला असेल तर  2 मे 2005 रोजी कोणता वार असेल.

पर्याय :    1) शनिवार    2) रविवार    3) सोमवार    4) शुक्रवार

या प्रकारचे उदा. पुढील पद्धतीने सोडविल्यास कमीत कमी वेळात कमी आकडेवारी करून अचूक सोडविता येते.

म्हणून 117  = एक आठवडा + 4 दिवस 

जर 26 एप्रिल 2001 ला बुधवार असेल तर 2 मे 2005 ला (बुधवार + बाकी उरलेले 4 दिवस) = रविवार असेल.

वरील प्रकारचे उदाहरणे खालील नियम वापरून सोडवावेत.

1)    सर्वप्रथम तारीख व महिना यांचा वेगवेगळा गट करावा .

2)    लहान तारखेपासून मोठय़ा तारखेकडे (उदा. 26 एप्रिल लहान तर 2 मे मोठी याप्रमाणे) या तारखेकडे बाणांची दिशा दाखवावी.

3)    जर बाण (ण्) खाली असेल तर (+) चिन्ह लिहावे व जर बाण वर () असेल तर खाली (-) चिन्ह लिहा.

4)    जादा दिवस म्हणजे दोन तारखेंमधले दिवस तसेच जादा वर्ष म्हणजे वर्षांची वजाबाकी + त्या वर्षांमधील लीप वर्ष यांना मांडणी वरून योग्य ते चिन्ह देऊन त्यांची बेरीज करावी व त्यांना 7 ने भागून बाकी काढावी. म्हणजे दिलेल्या तारखेच्या वारात येणारी बाकी मिळविल्यास प्रश्नात विचारलेल्या तारखेचा वार मिळतो.
प्र. 4. 20 ऑगस्ट 2005 ला शनिवार असेल तर 5 ऑगस्ट 2002 ला कोणता वार असेल?

पर्याय :    1) शनिवार     2) बुधवार    3) सोमवार    4) मंगळवार

स्पष्टीकरण : 23 मार्च ते 9 सप्टेंबपर्यंत दिवस =

म्हणून -197  = दोन आठवडा – 5 दिवस

जर 20 ऑगस्ट 2005 ला शनिवार होता तर 5 ऑगस्ट 2002 ला शनिवार – 5 = सोमवार होता.
प्र. 5.    जर शिक्षक दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी असेल?

पर्याय :    1) सोमवार    2) बुधवार    3) मंगळवार    4) रविवार

स्पष्टीकरण : शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो तर गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते. म्हणजे 5 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यांमधील जादा दिवस = 25 +2 = 27

    म्हणून 277  = बाकी 6

    जर शिक्षक दिन मंगळवारी असेल तर गांधी जयंती मंगळवार + 6 = सोमवारी असेल.
प्र. 6. अमित हा अमरपेक्षा तीन दिवसांनी लहान आहे. अमितचा जन्म शनिवारी झालेला असल्यास अमरचा जन्म कोणत्या वारी झाला?

पर्याय :    1) बुधवार    2) सोमवार    3) रविवार    4) मंगळवार

स्पष्टीकरण : अमितचा जन्म जर शनिवारी असेल तर अमरचा जन्म शनिवार -3 =बुधवारी झालेला असेल.
प्र. 7.    जर मार्चच्या 4 तारखेला मंगळवार असेल तर त्याच महिन्यातील शेवटचा शनिवार कोणत्या तारखेला असेल?

पर्याय :    1) 28 मार्च    2) 29 मार्च    3) 22 मार्च    4) 15 मार्च

स्पष्टीकरण : जर 4 मार्चला मंगळवार आहे म्हणून 11, 18, 25 मार्च मंगळवारच असेल म्हणून महिन्याचा शेवटचा शनिवार  4 दिवसांनी म्हणजे 25 + 4 = 29 मार्चला असेल.
प्रश्नांची उत्तरे : प्र. १- ४, प्र. २- ३, प्र. ३- २, प्र. ४- ३, प्र. ५- १, प्र. ६- २, प्र. ७- २.

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

🌷इथे संपली माणुसकी

एकदा एक माणूस जंगलात शिकारीला गेला होता. पण वाट पाहुनही त्या दिवशी सावज काही मिळाले नाही. 
          शेवटी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी तो जंगलातल्या तळ्याजवळ  थांबला.हातातला तीर कामठा खाली ठेवून तो पाणीप्यायला लागला, एवढयात समोरून वाघ येताना त्याला दिसला.
तो भीतीने पळायला लागला. वाघ पाठीमागे येतोय, हे बघून त्यांने जवळच्या झाडावर चढायला सुरुवात केली.पण झाडावर आधीच चढून बसलेलं अस्वल बघून त्याची भीतीने गाळण
उडाली.
          वर अस्वल,खाली वाघ! आता काय करायचं ?
तेवढयात अस्वल त्याला म्हणाला, "घाबरु नको. वर ये. मी तुला काही करणार नाही. मी वाघापासून जीव
वाचविण्या
साठीच इथे आलोय."

        माणूस मग वर गेला. वाघ मात्र झाडाखालीच बसून हे दोघे कधी खाली येतील यांची वाट पाहत होता.रात्र झाली तशी माणसाला झोप लागली. हे बघून वाघ अस्वलाला म्हणाला, "हा परका माणूस. त्याला खाली ढकलून दे. माझी भूक भागली की मी तुला काही करणार नाही."
           वाघाने खूप खूप पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण विश्वासू व ईमानदार अस्वलानं तसं केलं नाही.
थोड्या वेळानं माणसाला जाग आली. ठरल्याप्रमाणेच आता माणूस जागरण करू लागला व अस्वलानं जरा डोळे मिटले. वाघानं हीच  संधी साधली.तो माणसाला म्हणाला, "अस्वलाला खाली ढकल. माझी भूक भागेल आणि तुझा जीव वाचेल.
"माणसानं क्षणाचाही मागचा पुढचा विचार न करता अस्वलाला धक्का दिला. सुदैवाने माणसाचा स्पर्श होताच अस्वलाला जाग आली होती व चतुराईने अस्वलानं पंजानं फांदीला घट्ट पकडले. त्यामुळे ते पडलं नाही.पण त्याला माणसाचा विश्वासघातकी स्वभाव कळला.ते म्हणालं,"मी तुझ्याशी दगा केला नाही. परंतु तू मात्र मला फसवलंस."पशूंवर" विश्वास ठेवता येतो, "माणसांवर" नाही, हे मला आज समजलं."

🌸तात्पर्य ध्यानात ठेवा🌸

        पाठीत खंजर खुपसून कोणाचेही भले झाले नाही म्हणून अस्वलाचे हे शब्द खरे ठरवायचे की खोटे,हेआपल्या हातात आहे.

ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.मानसातली माणुसकी एवढी खाली का आली ? एवढा खालच्या पातळीवर तो का आला ? पशू पेक्षाही खालच्या थराला का गेला ? याचे आत्मचिंतन होण्याची गरजआहे.अस्वलाने दिलेला शाप म्हणूनच की, काय आज माणसं चोरी करायला लागले अन्  कुत्री त्याला शोधू लागली.लक्षात घ्या की, सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणारया असतात, याउलट जो दुसरयाला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही.

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

* रजा नियम *


==========================
▶महाराष्ट्र नागरी सेवा नियम-१९८१◀
==========================
     महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतील तरतुदी सर्व शिक्षक व सरकारी नोकरांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.नोकरी लागल्यापासून ते नोकरी असेपर्यंत व निवृत्ती झाल्यानंतरही नियमांची आवश्यकता असते तेव्हा या नियमांचा अभ्यास क्रमप्राप्त आहे हे नियम १५ ऑगस्ट १९८१ पासून अंमलात आले आहेत.
    महाराष्ट्र नागरी सेवा नियम-१९८१ >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
-------------------------------------------------
      शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या सेवाकाळात विविध प्रकारच्या रजा मिळत असतात. त्या उपभोगत असतांना सेवेत त्याचे महत्व व परिणाम आपणांस माहिती असावी तर जाणून घेऊ-

▶महाराष्ट्र नागरी सेवा(रजा)नियम-१९८१◀

                  महाराष्ट्र नागरी सेवा(रजा) नियम-१९८१ या अधिनियमात साधारणतः नियम-१ ते ९७ असून विविध रजांची सविस्तर माहिती आहे.
⏺रजाविषयक सर्वसामान्य अटी:-नियम-१० :-
------------------------------
       रजा म्हणजे सक्षम अधिकाऱ्याचा कामावर गैरहजर असल्याचा परवाना. रजेचा अर्ज केल्यावर  रजा मिळेलच असे नाही. सर्वस्वी हा शासनाचा स्वेच्छाधीन अधिकार आहे.सार्वजनिक हितार्थ रजा मंजूर, नामंजूर करणे हे अधिकार शासनाचे आहेत.
⏺रजेची मंजूरी नियम-११ ते २२:-
-----------------------------------------
१)रजा मंजूर करतांना शिल्लक रजा,पूर्वी घेतलेली रजा,रजा मुदतीत व्यवस्था, प्रकार, कारण व अपेक्षिलेली रजा यांचा विचार केला जातो.
२)अनेक प्रकारच्या रजा संयुक्तपणे घेता येतील.
३)अपवादात्मक परिस्थितीत खास प्रकरणांसह पाच वर्षांपेक्षा जास्त रजा सलगपणे घेता येत नाही.
४)रजा मुदतीत अन्य नोकरी स्वीकारता येणार नाही.
⏺किरकोळ रजा:-
-------------------------
निश्चित नियमांनी उपबंधित करता येणार नाही अशा विशेष परिस्थितीत देण्यात येते.
शासकीय कर्मचारी (शिक्षकेत्तर)यांना ८ दिवस .
मुख्याध्यापक व शिक्षक यांना १२ दिवस किरकोळ रजा मिळते.
   एकावेळी सुट्टी कालावधी धरून ७ दिवसांपेक्षा जास्त घेता येणार नाही.तसेच या रजेस जोडून दीर्घ रजा घेता येणार नाही.
देय व अनुज्ञेय रजेचे प्रकार
▶अ) सामान्य प्रकार:-
~~~~~~~~~~~~~~
१)अर्जित रजा (नि.५० ते५४)-
~~~~~~~~~~~~~~~~
-  सुट्टया मिळणाऱ्या खात्याव्यतिरिक्तच्या सेवकास प्रत्येक सहामाहीस १५ दिवस याप्रमाणे मिळते.
-  मुख्या. व शिक्षक यांना प्रत्येक सहामाहीस ०५ दिवस मिळतात.
-  एका वेळेस १८० दिवसांपेक्षा जास्त घेता येत नाहीत.
-  जास्तीत जास्त ३०० दिवस साठवता येते.
-  रजा पुर्ण दिवसात मंजूर करावी.
-  निलंबन काळ सहामाहीत समाविष्ट नसतो.
२)अर्धपगारी रजा(नि.६०):-
~~~~~~~~~~~~~~~
-  शासकीय सेवकास वर्षासाठी २० मिळतात.
-  वैद्यकीय अथवा खाजगी कारणासाठी मिळेल.
-  रजा साठवण्यास किंवा एका वेळी घेण्यास बंधन नाही.
-  यात वेतन ५० टक्के तर महागाई भत्ता,घरभाडे, पूरक भत्ता पूर्ण मिळतो.
३)परावर्तित रजा (नि.६१):-
~~~~~~~~~~~~~~
अर्धपगारी रजेच्या गटात तर वैद्यकीय कारणाशिवाय दिली जात नाही.
४)नादेय रजा किंवा अनार्जित रजा (नि.६२):-
~~~~~~~~~~~~~~
कर्मचारी परत सेवेत हजर होईल अशी खात्री पटल्यानंतर ही रजा देता येते.ही कायम कर्मचारी यांनाच मिळते.
५)असाधारण रजा किंवा अवेतनिक रजा (नि.६३):-
~~~~~~~~~~~~~~~~~
रजा शिल्लक नसतांना विशिष्ट बाब म्हणून दिली जाते.
▶ब) खास प्रकार:-
~~~~~~~~~~~
   याबाबतचा हिशोब स्वतंत्ररित्या ठेवला जात नाही.
१)विशेष विकलांगता रजा-
~~~~~~~~~~~~~~
सेवा बजावतांना शारीरिक अथवा मानसिक विकलांगता झाल्यास-कमाल २४ महिने देय पैकी १२० अर्जित रजेप्रमाणे वेतन नंतर अर्धपगार वेतन.
२)अध्ययन रजा (नि.८० ते ९३):-
~~~~~~~~~~~~~~~
  उच्च शिक्षण व व्यावसायिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी कमाल २८ महिने.
३)प्रसुती रजा (नि.७४):-
~~~~~~~~~~~~~
-  फक्त स्त्री कर्मचाऱ्यास देय आहे.
-  ह्यात दोन अपत्य यांना १८० दिवस याप्रमाणे मंजूर होते.
- १ वर्षापर्यंत सेवा वेतन मिळत नाही.
-  २ वर्षापर्यंत सेवा अर्धपगारी रजा मिळते.
-  या रजेला जोडून देय व अनुज्ञेय रजा घेता येते.
-  शिक्षण सेवक कालावधी पुढे वाढविला जाणार नाही. शासन निर्णय-२५/३/३०१३
-  गर्भपात अथवा मिसक्यारेज झाल्यावर ६ आठवडे रजा मिळते.
-  मूल दत्तक घेतलेल्या महिलेस १ वर्ष किंवा मुलाचे वय १ वर्ष होईपर्यंत रजा अनुज्ञेय आहे.
४)रूग्णालयीन रजा -(नि.७७):-
~~~~~~~~~~~~~~~~
वनरक्षक, तुरूंगरक्षक, प्रयोगशाळा कर्मचारी यांना देय
५) खलासी यांना मिळणारी रजा-(नि.७८)
▶क)सेवानिवृत्तीशी निगडीत रजा-(नि.६६):-
▶ड)रोखीत रूपांतर होणाऱ्या रजा-(नि.६८):-
शिक्षकांना लागू नाही.

▶इ) प्रासंगिक रजा

बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

कुमठे बिट शैक्षणिक अनुभव क्र. १३


✳  खड्यातुन संख्या शिकणे.

             या उपक्रमामध्ये केवळ ९ खड्यांतून मुले एक अंकी संख्या , १८ खड्यांतून दोन अंकी संख्या , २७ खड्यांतून तीन अंकी संख्या तसेच ३६ खड्यांतून चार अंकी संख्या लिहितात व वाचतात. याप्रमाणेच कृती केल्यास मुले कोटी पर्यतच्या संख्या वाचन व लेखन करतात.

✳ कार्यपद्धती :

एकक साठी खड़े रंग - काळा
दशक साठी खड़े रंग - पांढरा
शतक साठी खड़े रंग - पिवळा
हजार साठी खड़े रंग - हिरवा
          यापद्धतीने खड्याना रंग देऊन घेणे. वर्गात साधारण १५ ते २०सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ रेखाटून घेणे. आता एका मुलाला ठराविक अंतरावरून केवळ काळे ९ व पांढरे ९ खड़े वर्तुळात टाकण्यास सांगावे. वर्तुळात पडलेले खड़े केवळ विचारात घ्यावेत व वर्तुळाबाहेरील खड़े बाजूला ठेऊन द्यावेत. वर्तुळात पडलेल्या खड्यांपैकी प्रथम पांढरे खड़े मोजावेत व नंतर काळे खड़े मोजावेत.
       उदाहरणार्थ :
     गोलात १८ खड्यांपैकी ६ काळे खड़े व ७ पांढरे खड़े पडले. यात प्रथम पांढरे खड़े मोजावेत , डायरेक्ट ७ असे न मोजता १०,२०,३०,......,७० असे मोजावेत. व नंतर काळे खड़े मोजताना मोजलेले पांढरे खड़े सत्तर आणि काळा खड़ा एक ७१ व पुढे ७२,७३,७४,७५,७६ असे मोजावेत.
          यापद्धतीने ९९ पर्यन्तच्या संख्या पहिलीचे मुले १५ दिवसात तयार करु शकतात. याप्रमाणेच २७ खड़े घेऊन ९९९ पर्यंतच्या संख्या तर ३६ खड़े घेऊन ९९९९ पर्यंतच्या संख्या पहिलीचे मुले देखील तयार करतात. पुढे वेगळ्या रंगाचे खड़े वापरून हजारच्या पुढील संख्याही तयार करता येतात.

✳ या उपक्रमातुन पुढील उद्दीष्टे साध्य होतात :

१) मुर्त वस्तु संबोधाकडुन मुले संख्या संबोधा कडे जातात.
२) गोलात खडे टाकताना मुले आनंदायी पध्दतीने संख्या शिकतात .
३) घोकम पट्टी शिवाय संख्याचे दृढीकरण होते .
४) लहान वयोगटासही संख्या पटकन समजण्यास मदत होते.
५) एकक ,दशक, शतक ,हजार हे स्थानिक संबोध समजतात.

         या उपक्रमाचा सराव घेतल्यानंतर इ .३री च्या वर्गात मला आलेला अनुभव असा की, जी मुले संख्यावाचनात चुका करत होती , पाठीमागे होती ती मुले अतिशय आनंदाने व दडपणाशिवाय संख्या वाचन व लेखन करू लागली .
अगदी  पहिलीच्या वर्गास याच पध्दतीने सराव दिल्यानंतर ती मुले देखील ३ अंकी संख्या लवकरात लवकर वाचायला लागली. कुमठे बीटातील राकुसलेवाडी शाळेतील शिक्षक श्री .सुतार सर यांच्या कल्पनेतून कृतीत आलेला हा गणिती संख्या खेळ सर्वांना नक्कीच आवडेल.
          धन्यवाद!!!

                   गौरी पाटील
          उपशिक्षिका - चांदोरी मुले,
          ता.- निफाड, जि. नाशिक.

♦ गणितातील गंमत-जमत♦

नमस्कार मित्रानो,
दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हा घटक इयत्ता चौथी पाठयक्रमात आहे. तोच घटक आनंददायी पद्धतीने घेता येतो. या घटकाच्या सरावाबरोबर वजाबाकीचा देखील सराव यातून घेता येतो.हे सर्व थोर भारतीय गणित तज्ञ श्री.काप्रेकर यांचा स्थिरांक 6174 मुळे... काप्रेकरांनी हे इ.स.1949 मध्ये शोधून काढलं.यालाच 'काप्रेकारांचा स्थिरांक 1949' म्हणून ओळखलं जातो.

यांच्याविषयी वाचलं आणि याचा आज चौथी वर्गात वापर केला.खूप छान प्रतिसाद मिळाला.
चला तर मग जाणून घेऊया..
'काप्रेकर स्थिरांक-6174 '
====================
��प्रथम अशी चार अंकी संख्या निवडा, की त्यातील अंक सारखे नसतील म्हणजे (1111 किंवा 2222 नसतील अशी.

��त्या संख्येतील अंकांपासून मोठयात मोठी व लहानात लहान संख्या बनवून त्याची वजाबाकी करा.

��त्याचे जे उत्तर येईल त्यापासून परत ही कृती करा.आणि असे परत परत करत राहा.

��काही स्टेप ओलांडल्यानंतर दरवेळी उत्तर 6174 च येते.

प्रत्यक्ष उदाहरण पाहूत.
��आपण 2013 ही संख्या घेऊ.
त्यापासून मोठयात मोठी- 3210
लहानात लहान - 0123
याची वजाबाकी
3210 - 0123= 3087

��आलेल्या उत्तरापासून परत वरील प्रमाणेच कृती करुत.
8703 - 0378 = 8352
8532 -2358 = 6174
7641 - 1467 = 6174
��अशाप्रकारे परत परत तीच संख्या येते. 6174 हा काप्रेकरांच्या क्रियेचा गाभा आहे आणि हेच त्याचे वैशिष्ट्य देखील...

��������������������
याचे फायदे पाहूत.
१) लहान मोठी संख्या सरावासाठी मनोरंजक पद्धती.

२)मुलं आवडीने संख्या बनवतात व उदाहरणे सोडवतात.

३)जलद गणिती उदाहरण सोडविण्याची स्पर्धा निर्माण होते.

Try it amazing..

धन्यवाद..!������

���� संकलन ����
    उमेश कोटलवार

भारतीय 'गप्प बसा' संस्कृती


सर्वात चिकित्सक आणि विवेकाच्या अगदी जवळ कोण असते...? तर मला वाटतं की लहान मूलं ही सर्वाधिक चिकित्सक असतात आणि विवेकाच्या जवळ असतात...!
मूल ज्यावेळी बसायला लागतं...हळूहळू चालायला लागतं...बोलायला लागतं...त्यावेळी त्याची चंचलता अधिकच वाढलेली असते...या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी नवीन असते...त्याला समजून घेण्यासाठी ते धडपडत असतं...
लहान मुलाचा मेंदू हा कोऱ्या संगणकासारखा असतो...
जे-जे काही मिळेल त्यावर प्रक्रिया करणे..आणि साठवून घेणं...हा त्याचा ध्यास असतो..!
'धर्म' आणि 'जात' ही जन्माने मिळणारी गोष्ट आहे... त्यात कोणताही पराक्रम नाही...!
पण लहानपणापासूनच या धर्मसंस्काराच्या गोंडस नावाखाली अनेक गोष्टी आपण त्याच्या माथी भरत असतो...किंबहुना अनेक गोष्टींपासून त्याला अटकाव घालत असतो...!
आपण काय करतो..?
तर त्याला मूर्तिपुढे उभं करतो...आणि त्याला हात जोडायला लावतो...मूल हात जोडत नसतं,तरी आपण बळजबरी हात जोडायला शिकवतो...त्याला जमिनीला डोकं टेकवून नमस्कार करायला शिकवतो...
आणि त्याला म्हणतो...
'म्हण...मला चांगली बुद्धी दे..!मला शक्ती दे..!'
खरं तर देव या अलौकिक संकल्पनेपासून लहान मूल हे पूर्णपणे अनभिज्ञच असते...!

आणि सवयीने आपण नकळत त्याच्यावर असं बिंबवत असतो की...हि जी समोर ठेवलेली दगडाची मूर्ती आहे...ती तुला चांगली बुद्धी देईल...तुला शक्ती देईल...तुझं रक्षण करेल..!
आणि हे सगळं तूला तुझ्या केवळ बुद्धिसामर्थ्यावर...कर्तृत्वावर नाही तर ह्या देव नावाच्या काहीतरी अलौकिक गोष्टीपुढे नतमस्तक झाल्यावरच जमेल...
तोच कर्ता-धरता आहे...विघ्नहर्ता आहे...तोच तारेल...आणि...तोच मारेल..!
इथला सगळ्यात महत्वाचा संस्कार हा आहे...की ' प्रश्न विचारणारी मानसिकता मारून टाकायची..?' आणि 'गप्प बसा संस्कृती' रुजवायची..!
प्रश्न विचारने हा उद्धटपणा असून ते इथल्या संस्कारात मुळीच बसत नाही..!
लहानपणापासुन  जिज्ञासेच्या पोटी मुलं अनेक गोष्टी समजून घ्यायला उत्सुक असतात...
ह्याला हात लाव...त्याला हात लाव...हे वाजवून बघ...ते आपट...!
त्याला प्रत्येक गोष्ट 'हे काय आहे..?' हे जाणून घ्यायचा ध्यास असतो...
त्यासाठी प्रत्येक गोष्टीला 'असे का...?' असा प्रश्न साहजिकच ते विचारायला लागतं...
'कडी वाजल्यावर भांडने कशी काय होऊ शकतील..?,शनिवारी नखे का कापू नयेत.?,मांजर आडवं जाण्याचा आणि काम न होण्याचा संबंध काय.? वगेरे-वगेरे गोष्टी त्याला भंडावून सोडत असतात...!
पण ज्यावेळी ते घरातल्यांना प्रश्न विचारतं की,"बाबा गणपतीला चार हात कसे काय ओ..? आपल्याला का नाहीत...?"
तेंव्हा फार-फार तर बाबा 'अरे तो देव आहे...!' इतकंच उत्तर देऊ शकतील..! पण त्यांच्या या उत्तराने नक्कीच समाधान होणार नसतं...मग तो आणखी पुढे जाऊन ज्यावेळी अस विचारतो की..'बाबा त्याला सोंड कशी काय..?' मग त्याला ती नेहमीचीच कथा ऐकवली जाते...! एवढ्यानेही तो गप्प बसत नाही...यापुढेही जाऊन तो असे अनेक प्रश्न विचारू पाहतो...की ज्याची उत्तरं देणं, हे जमणं शक्यच नसतं...
'शंकराला तिन डोळे कसे...इथपासून ते रावणाला 10 तोंडे कशी..?
मग नेहमीप्रमाणे अशावेळी किंवा सर्वसामान्यतः "कार्ट्या...गप्प बैस देवासारखा...!" हे उत्तर तर ठरलेलेच असतं..!
म्हणजे जिथे 'गप्प बसणे...हे देवपणाचे लक्षण मानलं जाते..' तिथली मुले पुढे प्रश्न विचारायला कशी धजावणार...?
'प्रसाद उजव्याच हातात का घ्यायचा...डाव्या हातात का नाही...? गणपतीने तर मोदक डाव्या हातातच घेतलाय..!'
अशी चिकित्सा लहान मुलाला उद्धट ठरवून मोकळी होते..!
असे तर्क करुण प्रश्न विचारलेले चालत नाहीत...कारण हां त्यांना त्यांच्या श्रद्धेवरील आणि धर्मामवरील हल्ला वाटतो...!

लक्षात घ्या...
मानवी इतिहासामधे वाघ निर्माण होऊन झाली 4 कोटी वर्षे....आणि माणूस निर्माण होऊन झाली अवघी 5 लाख वर्षे...! गुहेत राहनारे,शिकार करणारे,मांस खाणारे,नग्न फिरणारे हे दोन्ही प्राणी आज तसेच आहेत का...?
माणूस प्राण्याने वाघ प्राण्यापेक्षा प्रगती केली...म्हणून आज तो साऱ्या विश्वाचा स्वामी बनला...मात्र जंगलातील वाघ तसाच राहिला...!
याच कारण काय..?
याच कारण असं...की माणूस प्राण्याला 'प्रश्न' पडले...वाघाला कधीच असा प्रश्न पडला नाही की 'पाऊस का पडतो..? पण तो माणसाला पडला...त्याने अशा प्रश्नामागची कारणे शोधली...

'माणसाचा आजवरचा इतिहास..हे दुसरं-तिसरं काही नसून तो श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे...!'

अग्निला...पावसाला...जंगलातील वणव्याला...काहीतरी अचाट आणि अलौकिक मानणारा माणूस प्राणी जर त्याविषयी गप्प बसला असता आज तो 'विश्वाचा स्वामी' या स्थितीला नसताच..! तो इतर प्राण्यापेक्षा कमी काळात पुढारला...याचे कारण...त्याला प्रश्न पडले...आणि त्याने या प्रश्नासाठी आपल्या 'श्रद्धा'तपासल्या...!

पण जर 'प्रश्न विचारायचा नाही...जे पूर्वापार चालत आलेले आहे...ते मुकाट्यांन स्विकारायचं..!'
'हे असे का..?ते तसे का...?' असे प्रश्न अजिबात विचारयचा नाही...! अशी मानसिकता जर इथे संस्कार म्हणून बिंबवली जात असेल...तर आपण 'माणूस' म्हणून पुढे जातोय की मागे..?

यातील नीतीसाठी म्हणून बिंबवल्या जाणाऱ्या ह्या आणि अशा गोष्टी नंतर 'नितीसाठी कमी आणि भितीमुळे आणि भीतीसाठी' जास्त पोसल्या जातात...! आणि ह्याच गोष्टींचा अतिरेक पुढे जाऊन अनितीलाही कारणीभूत ठरतो...!

भुत नावाचा संस्कारही आपण पदोपदी त्याच्या माथी मारत असतो...
'जेव नाही तर बागुलबुवा येईल..!'
अशा मानसिकतेतून त्याला नेभळट बनवण्याचा संस्कार केला जातो...
या जगात सुष्ट आणि दुष्ट शक्ती आहेत...की ज्या चांगलं किंवा वाईट घडवत असतात...
सुष्ट शक्तींची उपासना...आराधना दुष्ट शक्तिपासून वाचवन्यास मदत करेल...वगेरे-वगेरे...हां संस्कार  सुद्धा ओघाओघाने लहान मुलावर होतोच...!
ह्या सगळ्याच्या दरम्यानच त्याला ओळख होते ती...
'मोक्ष,आत्मा-परमात्मा,पुनर्जन्म,नशीब, पूर्वसंचित..' या आशा 'अध्यात्म' नावाच्या गोड-गोंडस नावाखाली खपवल्या जाणाऱ्या फालतुगिरीची...!
साहजिकच या गोष्टीबद्दल आकर्षण वाटणं..आणि त्या समजून घेणं...हे आलच...!
पण ह्या सगळ्या गोतावळ्याची मांडणी 'बाबापरत्वे...पंथपरत्वे...धर्मपरत्वे....बदललेली असते..!'
ह्या बाबतीत निश्चित असं ठोस उत्तर...पुराव्यानिशी मांडणी कुणीच केलेली नाहिये...'श्रद्धा ठेवा..' हे एकच काय ते परिमाण या तकलादू गोष्टींचा मुख्य आधार आहे...!
'तर्क-कुतर्कासी....
ठाव न लगे सायासी...
येथे भावची प्रमाण...
ठेवा जाणीव गुंडोण..."
म्हणजे...तर्क करायचा नाही कारण तो कुतर्क आहे... भावनेलाच प्रमाण माना...जाणीव गुंडाळून ठेवा..."
याला श्रद्धा कशी म्हणता येईल...?
प्रश्न न विचारता अशी जाणीव गुंडाळून ठेवणं...आणि 'हो ला हो' म्हणणे हेच काय ते अध्यात्म..! ह्या सगळ्या गोष्टी ह्या मुलाच्या जडण-घडणीच्या काळात पुरेपूर घुसडल्या जातात...
"तुझी परिस्थिती आता अशी आहे..याचे कारण हे तुझ्या पूर्वजन्मीचं हे फळ आहे...हेच तुझ्या नशिबात आहे....पूर्वसंचित आहे...! आणि तुझ्या ह्या जन्मीच्या वागणुकीचं फळ तुला पुढच्या जन्मी मिळेल...!" हा कर्मविपाकाचा सिद्धांत हे इथल्या मानसिकतेचं पूर्वापार चालत आलेलं मूळ आहे...!

डॉक्टर-इंजिनिअर बनूनही भ्रामक वास्तुश्रद्धाशास्त्राने घराची बांधणी करणारी... जोतिषाकडे जाऊन हातातल्या रेषांमधे भविष्य शोधणारी...आणि कुंडलीेतल्या मंगळाच्या अस्तित्वावर लग्न करावे की नको...याचा निर्णय घेणारी तरुण पीढी 'प्रगल्भ आणि विज्ञानवादी' कशी म्हणता येईल...?
21 व्या शतकातही विज्ञानाचा वापर करुन दैववादी मानसिकतेचचं मार्केटिंग होणार असेल ...किंबहुना ते जास्त जोरात होणार असेल तर ते 'होमिसेपिअन-सेपियन' (अधिक प्रगल्भ होत जाणारा) म्हणवून घेणाऱ्या माणसाला हे कसे शोभेल...?
हे सगळे चालुये...
याचं कारण माणसानं "विज्ञानाची सृष्टी आत्मसात केलीये पण विज्ञानवादी दृष्टी आत्मसात नाही केली...!"
आजवर अशी एकही गोष्ट नाही की जीची उत्तरे शोधण्यास या दैववादी मानसिकतेने मदत केलीये...!आयुष्यात आलेल्या संकटांची उकल दैववादी मानसिकतेतून होणं अशक्य आहे...!

लहानपणापासून अशा पद्धतीने तयार होणारी दैववादी मानसिकता ही इथल्या 'प्रश्न विचारायचाच नाही' या संस्काराचा आणि 'गप्प बसा' संस्कृतीचा परिपाक आहे..!

आणि म्हणूनच भगतसिंग म्हणाला होता की, "या देशातले जे तरुण दैववादी आहेत ते माझ्या दृष्टीने नामर्द...नेभळट आहेत..!"
'का..?' हा प्रश्न विचारायला सुरवात करणे ही या दैववादी मानसिकतेला तिलांजली देण्याची सुरवात आहे..!
साहजिकच काही प्रश्नांना वयाचं बंधन आहे...!

पण प्रश्न आहे तो 'प्रश्न विचारायचाच नाही...'
या संस्काराचा...!
हा संस्कार 'माणूस' म्हणून पुढे नेणारा की मागे नेणारा...?

याचा कुठेतरी विचार व्हायला हवा..!

येणारी भावी पिढी त्याचवेळी विज्ञानवादी आणि प्रगतशील म्हणता येईल ज्यावेळी ती 'का..?' हां प्रश्न आपल्या जिभेवर नेहमी ठेवेल आणि आपल्या प्रश्नांची उकल 'मन...मनगट...आणि मेंदू' यावर विश्वास ठेवूनच करेल...अस मला वाटतं...!    .

Popular Posts

शब्दांच्या जाती

शब्दांच्या जाती - मराठी व्याकरण (Interactive Explorer) ...