Pages

संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५

विद्यार्थ्यांचा सर्वांगिण आणि ज्ञानेंद्रियांचा विकास

मुलांच्या वाढीचे आणि विकासाचे टप्पे योग्य वेळेत, योग्य वयात पूर्ण होणे महत्वाचे असते. तरच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्यवस्थित प्रकारे होतो. शारीरिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक, भाषिक विकास सर्वांगिण विकासाच्या अंतर्गत केला जातो. मुलांच्या  विकासात महत्वाची भूमिका आहाराची असते. सकस आहाराने मुले निरोगी राहून शारीरिकरित्या सुदृढ बनतात.
ज्ञानेंद्रियांचा विकास
डोळेडोळ्याने विद्यार्थी वस्तू ओळखतात, दोन वस्तूंमधील फरक समजतात,विविध रंगाच्या, आकाराच्या, उंचीच्या वस्तू दाखवणे, अशा अनेक प्रकारे शिक्षक त्यांना अनुभव देतात.
नाकवास घेण्यासाठी आणि श्वासोच्छवासासाठी नाकाचा उपयोग होतो. सुगंध आणि दुर्गंध यांतील फरक दाखवणे. फुलांचा आणि अत्तराचा वास घेऊन तो मुलांना  ओळखण्यास सांगणे.
काननिरनिराळे आवाज ऐकणे, सुरेल आवाज, कर्कश आवाज, माणसांच्या आवाजातील फरक दाखवून देणे. पाण्याचा, वाहनाचा, प्राण्यांचा असे अनेक आवाज ओळखण्यास सांगणे.
जीभजीभेवरील ज्ञानतंतूमुळे माणसाला गोड, खारट, आंबट, कडू,आदी चवींचे ज्ञान होते. जीभेवरील ज्ञानतंतूमुळे संवेदना निर्माण होऊन चव कळते. विद्यार्थ्यांना विविध पदार्थ चाखावयास देऊन त्यांना चवींची ओळख आणि फरक समजावून सांगू शकतो.
त्वचात्वचेच्यास्पर्शातून संवेदना कळतात. विविध वस्तूंचे स्पर्श अनुभवण्यास देऊन उदा.  गरम, थंड, ओला, सुका, खरखरीत, गुळगुळीत असे अनेक स्पर्शअनुभव विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो.
अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Popular Posts

आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योग कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक २१ जून २०२५ रोजी *महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक ३, बादाडे, लातूर* येथे **आंतरराष...